पावसात झाडांच्या फायद्या तुटूनवीजवाहिन्यांवर पडतात , तसेच झाडे पडल्याने खांब वाकूनतारा तुटण्याचे प्रकार घडतात . अशा तुटलेल्या -लोंबकळणाऱ्या वाहिन्यांपासून सावध रहावे , त्याहटविण्याचा किंवा हात लावण्याचा प्रयत्न करू नये , असे महावितरणने म्हटले आहे . तसेच पूर किंवा अतिवृष्टीमुळेखबरदारीचा उपाय म्हणून वीजपुरवठा बंद करण्यात येतो , अशा काळात नागरिकांनी सहकार्य करावे , असेहीआवाहन करण्यात आले आहे . पावसाळ्यात घरातील स्वीचबोर्ड किंवा विजेच्या उपकरणांचा ओलाव्याशी संपर्क येणार नाही , याची खबरदारीघ्यावी , घरातील वीजपुरवठ्यासाठी आवश्यक अर्थिंग केल्याची खात्री करावी . शॉर्टसर्किट झाल्यास मेन स्वीचतातडीने बंद करावा , घरावरील डिश किंवा अँटेने वीजतारांपासून दूर ठेवावी . ओल्या कपड्यांवर विजेची इस्त्रीफिरवू नये , तसेच विजेच्या खांबांना जनावरे बांधू नयेत किंवा दुचाकी वाहने टेकवून ठेवू नये , वीज खांबांवर कपडेवाळत घालू नयेत , असेही आवाहन करण्यात आले आहे . तक्रारींसाठी टोल फ्री क्रमांक : वीजसेवेबाबत तक्रार करण्यासाठी शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांनी १८०० – २०० – ३४३५ किंवा१८०० – २३३ – ३४३५ या २४ तास टोलफ्री क्रमांकांवर संपर्क साधावा , असे आवाहन महावितरणने केले आहे .